आचरण (२)

भूतकाळात, लोकांनी स्वतःला प्रत्येक क्षणी देवासोबत राहण्याचे आणि आत्म्यात राहण्याचे प्रशिक्षण दिले. आजच्या आचरणाच्या तुलनेत, ते साधे स्वरूपाचे आध्यात्मिक प्रशिक्षण आहे; लोक जीवनाच्या योग्य मार्गावर जाण्यापूर्वी हा आचरणाचा सर्वात उथळ व सोपा मार्ग आहे आणि तो लोकांच्या श्रद्धेतील आचरणाचा पहिला टप्पा आहे. जर लोक त्यांच्या जीवनात नेहमी या प्रकारच्या आचरणावर विसंबून राहिले, तर त्यांच्यामध्ये खूप भावना असतील व त्यांच्याकडून चुका होण्याची शक्यता असेल आणि ते जीवनातील खऱ्या अनुभवांमध्ये प्रवेश करण्यास असमर्थ असतील; ते केवळ त्यांच्या आत्म्यांना प्रशिक्षित करू शकतील, ते त्यांच्या हृदयामध्ये सामान्यपणे देवाच्या जवळ येऊ शकतील व देव त्यांच्यासोबत असण्याने त्यांना नेहमीच प्रचंड आनंद मिळेल. ते स्वतःला देवासोबतच्या त्यांच्या एकत्रतेच्या छोट्या व्याप्तीपुरते मर्यादित ठेवतील आणि अधिक खोलवर प्रवेश करू शकणार नाहीत. या सीमांच्या आत राहणारे लोक कोणतीही मोठी प्रगती करण्यास असमर्थ आहेत. कोणत्याही वेळी, ते असे ओरडू शकतात, “हे! प्रभू येशू. आमेन!” ते दररोज व्यावहारिकदृष्ट्या असे असतात—हे भूतकाळातील आचरण आहे, प्रत्येक क्षणी आत्म्यामध्ये जगण्याचे आचरण आहे. हे असभ्य नाही का? आज, जेव्हा देवाच्या वचनांवर विचार करण्याची वेळ आली आहे, तेव्हा फक्त देवाच्या वचनांचा विचार करण्यावर लक्ष केंद्रित करा; जेव्हा सत्य आचरणात आणण्याची वेळ येते, तेव्हा फक्त सत्य आचरणात आणण्यावर लक्ष केंद्रित करा; जेव्हा तुमचे कर्तव्य बजावण्याची वेळ येते, तेव्हा फक्त तुमचे कर्तव्य पार पाडा. या प्रकारचे आचरण प्रत्यक्षात मुक्त करणारे आहे; ते तुम्हाला मुक्त करते. वृद्ध धार्मिक माणसे कशी प्रार्थना करतात आणि आभार मानतात तसे हे नाही. अर्थात, पूर्वी, हे श्रद्धा असलेल्या लोकांचे आचरण होते, परंतु आता असे आचरण करणे फारच मागासलेले आहे. देवाचे कार्य आता उच्च पातळीवर आहे; आज ज्या गोष्टीबद्दल बोलले जाते, “देवाला वास्तविक जीवनात आणणे,” हा आचरणाचा सर्वात महत्त्वाचा पैलू आहे. हीच सामान्य मानवता आहे जी लोकांच्या वास्तविक जीवनात असणे अपेक्षित आहे व देवाने आज बोललेली सर्व वचने लोकांच्या सामान्य मानवतेमध्ये असायला हवीत. देवाची ही वचने वास्तविक जीवनात आणणे हाच “देवाला वास्तविक जीवनात आणणे” याचा व्यावहारिक अर्थ आहे. आज, लोकांनी स्वतःला प्रामुख्याने पुढील गोष्टींसह सुसज्ज केले पाहिजे: एका बाबतीत, त्यांनी त्यांची क्षमता सुधारली पाहिजे, शिक्षित झाले पाहिजे आणि त्यांचे वाचन व आकलन कौशल्य सुधारले पाहिजे; दुसऱ्या बाबतीत, त्यांनी सामान्य व्यक्तीचे जीवन जगले पाहिजे. तू जगातून नुकताच देवासमोर आला आहेस; तू प्रथम तुमच्या हृदयाला देवासमोर शांत राहण्यासाठी प्रशिक्षित केले पाहिजे. ही आचरणाची अगदी सुरुवात आहे आणि जीवन प्रवृत्तीत बदल घडवून आणण्याची ही पहिली पायरी आहे. काही लोक त्यांच्या आचरणात बऱ्यापैकी जुळवून घेतात; ते कार्य करताना सत्याचा विचार करतात, सत्य व आचरणाची तत्त्वे शोधून काढतात जे त्यांना प्रत्यक्षात समजले पाहिजे. एक पैलू असा आहे, की तुमचे सामान्य मानवी जीवन असले पाहिजे आणि दुसरे म्हणजे सत्यात प्रवेश असणे आवश्यक आहे. या सर्व गोष्टी वास्तविक जीवनासाठी सर्वोत्तम आचरण आहेत.

देवाला लोकांच्या वास्तविक जीवनात आणण्यासाठी प्रामुख्याने त्यांनी देवाची उपासना करणे, देव जाणून घेण्याचा प्रयत्न करणे आणि सामान्य मानवतेमध्ये देवाच्या निर्मिलेल्या प्राण्याचे कर्तव्य पार पाडणे आवश्यक आहे. असे नाही, की त्यांना प्रत्येक वेळी काही केल्या देवाची प्रार्थना करावीच लागते, किंवा त्यांनी प्रार्थना केली नाही, तर ते ठीक नाही व तर त्यांना देवाचे ऋणी वाटले पाहिजे, असेही नाही. आजचे आचरण तसे नाही; हे खरोखर सुलभ आणि सोपे आहे! यासाठी लोकांना सिद्धांतांचे पालन करण्याची आवश्यकता नाही. त्याऐवजी, प्रत्येक व्यक्तीने त्यांच्या वैयक्तिक पातळीनुसार वागले पाहिजे: जर तुमच्या कुटुंबातील सदस्य देवावर विश्वास ठेवत नसतील, तर त्यांना नास्तिक म्हणून वागवा आणि जर ते विश्वास ठेवत असतील, तर त्यांना आस्तिक म्हणून वागवा. प्रेम आणि संयमाने नाही, तर शहाणपणाने आचरण करा. काही लोक भाजी विकत घेण्यासाठी बाहेर पडतात व चालत असताना ते गुणगुणतात: “हे देवा! आज तू मला कोणती भाजी घ्यायला लावशील? मी तुझ्या मदतीची याचना करतो. देवाने सांगितले, की आम्ही सर्व गोष्टींमध्ये त्याच्या नावाचा गौरव करावा आणि आम्ही सर्वांनी साक्ष द्यावी, म्हणून जरी विक्रेत्याने मला काहीतरी कुजलेले दिले, तरी मी देवाचे आभार मानेन—मी सहन करेन. आम्ही देवावर विश्वास ठेवणारे भाजीपाला निवडू व वेचू शकत नाही.” त्यांना असे वाटते, की हे करणे म्हणजे साक्ष आहे आणि याचा परिणाम म्हणजे ते कुजलेल्या भाज्या विकत घेण्यासाठी पैसे खर्च करतात, परंतु तरीही ते प्रार्थना करतात व म्हणतात: “हे देवा! जोपर्यंत तुला स्वीकार्य असेल तोपर्यंत मी या कुजलेल्या भाज्या खाईन.” असे आचरण मूर्खपणाचे नाही का? हे सिद्धांत पाळणे नाही का? याआधी, लोकांना प्रत्येक क्षणी आत्म्याने जगण्याचे प्रशिक्षण दिले गेले होते—हे कृपेच्या युगात पूर्वी केलेल्या कार्याशी संबंधित आहे. धार्मिकता, नम्रता, प्रेम, संयम, सर्व गोष्टींसाठी आभार मानणे—कृपेच्या युगात प्रत्येक आस्तिकाला हे आवश्यक होते. त्या वेळी, लोक सर्व गोष्टींमध्ये देवाची प्रार्थना करत असत; जेव्हा ते कपडे विकत घेत, तेव्हा ते प्रार्थना करत असत आणि जेव्हा एखाद्या संमलेनाची सूचना दिली जात असे, तेव्हा ते प्रार्थना करत असत: “हे देवा! मी जावे अशी तुझी इच्छा आहे की नाही? जर तुला मी जायला हवे असेल, तर माझ्यासाठी चांगला मार्ग तयार कर. जर तुला मी जायला नको असेन, तर मला अडखळून पडायला लाव.” प्रार्थना करताना ते देवाकडे याचना करत असत व प्रार्थना केल्यावर त्यांना अस्वस्थ वाटत असे आणि ते जात नसत. काही भगिनींना, संमेलनातून घरी परतल्यावर त्यांच्या नास्तिक पतींकडून मारहाण होण्याच्या भीतीने, प्रार्थना करताना अस्वस्थ वाटत असे व म्हणून त्या संमेलनांना जात नसत. ही देवाची इच्छा आहे असा त्यांचा विश्वास होता, खरेतर, जर त्या गेल्या असत्या, तर काहीही झाले नसते. त्याचा परिणाम असा झाला, की त्यांनी संमेलन चुकवले. हा सर्व लोकांच्या अज्ञानाचा परिणाम आहे. जे लोक अशा प्रकारे आचरण करतात ते सर्व त्यांच्या स्वतःच्या भावनांनी जगतात. आचरण करण्याचा हा मार्ग खूप चुकीचा आणि हास्यास्पद आहे व अस्पष्टतेने रंगलेला आहे. त्यांच्या वैयक्तिक भावना आणि विचार खूप आहेत. तुला संमेलनाबद्दल सांगितले आहे, तर जा; यापुढे देवाला प्रार्थना करण्याची गरज नाही. हे सोपे नाही का? जर तुला एखादे वस्त्र खरेदी करायचे असेल, तर लगेच बाहेर जा व खरेदी कर. देवाला प्रार्थना करून असे म्हणू नका: “हे देवा! तू मला जायला सांगशील की नाही? मी गेल्यावर बंधुभगिनींपैकी एकजण आला तर काय होईल?” तुम्हाला भीती वाटते, की एखादा बंधू किंवा भगिनी येईल म्हणून तुम्ही जात नाही, तरीही परिणाम असा होतो, की संध्याकाळ उलटते व कोणीही येत नाही. कृपेच्या युगातही, आचरणाचा हा मार्ग विचलित आणि चुकीचा होता. अशा प्रकारे, जर लोकांनी पूर्वीप्रमाणे आचरण केले, तर त्यांच्या जीवनात कोणताही बदल होणार नाही. ते केवळ जे काही समोर येईल त्याला स्वतः शरण जातील, विवेकाकडे लक्ष देणार नाहीत आणि आंधळेपणाने आज्ञा पाळणे व सहन करणे याशिवाय काहीही करणार नाहीत. त्या वेळी, लोकांनी देवाचा गौरव करण्यावर लक्ष केंद्रीत केले—परंतु देवाला त्यांच्याकडून कोणताही गौरव प्राप्त झाला नाही, कारण त्यांनी व्यावहारिक काहीही केले नव्हते. त्यांनी केवळ स्वतःला रोखले आणि त्यांच्या वैयक्तिक धारणांनुसार स्वतःला मर्यादित केले व अनेक वर्षांच्या आचरणानेही त्यांच्या आयुष्यात कोणताही बदल झाला नाही. त्यांना फक्त सहन करणे, नम्र असणे, प्रेम करणे आणि क्षमा करणे हे माहीत होते, परंतु त्यांना पवित्र आत्म्याचे किंचितही ज्ञान नव्हते. लोक देवाला अशा प्रकारे कसे ओळखू शकत होते? आणि ते देवाचा गौरव कसे करू शकत होते?

जर लोकांनी देवाला त्यांच्या वास्तविक जीवनात आणि त्यांच्या सामान्य मानवी जीवनात आणले, तरच लोक देवावर विश्वास ठेवण्याच्या योग्य मार्गावर प्रवेश करू शकतात. देवाची वचने आज तुम्हाला मार्गदर्शन करतात; भूतकाळाप्रमाणे शोधण्याची व चकरा मारण्याची गरज नाही. जेव्हा तू देवाच्या वचनांनुसार आचरण करू शकतोस आणि मी प्रकट केलेल्या मानवी अवस्थांनुसार स्वतःचे परीक्षण व मोजमाप करू शकतोस, तेव्हा तू बदल साध्य करू शकतोस. हा सिद्धांत नाही तर देवाची मनुष्याकडून असलेली अपेक्षा आहे. आज मी तुला सांगतो, की गोष्टी कशा आहेत: फक्त माझ्या वचनांनुसार वागण्याची काळजी घ्या. माझ्या तुझ्याकडून असलेल्या अपेक्षा सामान्य व्यक्तीच्या गरजांवर आधारित आहेत. मी तुला माझी वचने आधीच सांगितली आहेत; जोपर्यंत तू त्यांचे आचरण करण्यावर लक्ष केंद्रीत करशील, तोपर्यंत तू देवाच्या हेतूंशी सुसंगत असशील. आता देवाच्या वचनांमध्ये जगण्याची वेळ आली आहे. देवाच्या वचनांनी सर्व गोष्टींचे स्पष्टीकरण दिले आहे, सर्व काही स्पष्ट केले आहे आणि जोपर्यंत तुम्ही देवाच्या वचनांनुसार जगता, तोपर्यंत तुम्ही पूर्णपणे स्वतंत्र व मुक्त जीवन जगाल. भूतकाळात, जेव्हा लोकांनी त्यांच्या वास्तविक जीवनात देव आणला, तेव्हा त्यांनी खूप सिद्धांत व प्रथांचे आचरण केले व त्यामधून गेले; अगदी किरकोळ बाबींमध्येही, ते प्रार्थना करत व शोध घेत असत आणि देवाची स्पष्टपणे सांगितलेली वचने बाजूला ठेवून ती वाचण्याकडे दुर्लक्ष करत असत. त्याऐवजी, ते त्यांचे सर्व प्रयत्न शोधण्यात घालवत असत—परिणामी कोणताही प्रभाव झाला नाही. उदाहरणार्थ अन्न आणि कपड्यांचे मुद्दे घ्या: तू प्रार्थना करतोस व या गोष्टी देवाच्या हातात सोपवतोस, देवाला तुझ्यासाठी सर्वकाही सोडवण्यास सांगतोस. देव जेव्हा हे शब्द ऐकेल, तेव्हा तो म्हणेल: “मला अशा क्षुल्लक गोष्टींबद्दल काळजी करण्याची गरज आहे का? मी तुझ्यासाठी निर्माण केलेली सामान्य मानवता आणि तर्कशक्ती कुठे गेली?” कधीकधी, कोणीतरी त्यांच्या कृतींमध्ये चूक करते; मग त्यांना वाटते, की त्यांनी देवाला नाराज केले आहे व ते स्वतःला कोंडून घेतात. काही लोकांची अवस्था खूप चांगली असते, पण जेव्हा ते एखादी छोटीशी गोष्ट चुकीच्या पद्धतीने करतात, तेव्हा त्यांना वाटते, की देव त्यांचे ताडण करत आहे. खरे तर, हे देवाचे करणे नाही, तर हा लोकांच्या स्वतःच्या मनाचा प्रभाव आहे. काहीवेळा, तू कसा अनुभव घेत आहेस यात काहीही चूक नसते, परंतु इतर म्हणतात, की तू योग्यरीत्या अनुभव घेत नाहीस आणि म्हणूनच तू जाळ्यात अडकतोस—तू नकारात्मक बनतोस व आतून दुःखी होतोस. सहसा, जेव्हा लोक अशा प्रकारे नकारात्मक असतात, तेव्हा ते मानतात की त्यांचे देवाकडून ताडण केले जात आहे, परंतु देव म्हणतो: “मी तुझ्यामध्ये ताडण करण्याचे कोणतेही कार्य केले नाही; तू मला असा कसा दोष देऊ शकतोस?” लोक खूप सहज नकारात्मक होतात. ते वारंवार अतिसंवेदनशील होतात आणि अनेकदा देवाबद्दल तक्रार करतात. तू अशा प्रकारे त्रास सहन करावास हे देवाला अपेक्षित नाही, तरीही तू स्वतःला त्या अवस्थेत पडू देतोस. अशा दुःखाला किंमत नाही. देवाने केलेले कार्य लोकांना माहीत नसते व अनेक गोष्टींबद्दल ते अज्ञानी असतात आणि ते स्पष्टपणे पाहू शकत नाहीत, म्हणून ते त्यांच्या स्वतःच्या धारणा व कल्पनांमध्ये अडकतात, अधिकाधिक खोलवर अडकतात. काही लोक म्हणतात, की सर्व गोष्टी आणि बाबी देवाच्या हातात आहेत—मग लोक नकारात्मक असतात, तेव्हा देवाला कळू शकत नाही का? अर्थात देवाला कळते. जेव्हा तू मानवी धारणांमध्ये अडकतोस, तेव्हा पवित्र आत्म्याला तुझ्यामध्ये कार्य करण्याचा कोणताही मार्ग नसतो. बर्‍याच वेळा, काही लोक नकारात्मक स्थितीत अडकतात, परंतु तरीही मी माझे कार्य पुढे सुरू ठेवतो. तू नकारात्मक असलास किंवा सकारात्मक, मी तुझ्यामुळे स्वतःवर बंधने घालत नाही—पण तुला हे माहीत असले पाहिजे, की मी उच्चारलेली अनेक वचने व मी करत असलेले बरेच कार्य लोकांच्या स्थितीनुसार एकमेकांशी जवळून जोडलेले असते. जेव्हा तू नकारात्मक असतोस, तेव्हा हे पवित्र आत्म्याच्या कार्यात अडथळा आणत नाही. ताडण आणि मृत्यूच्या कसोटीच्या काळात, सर्व लोक नकारात्मक स्थितीत अडकले होते, परंतु यामुळे माझ्या कार्यात अडथळा आला नाही. जेव्हा तू नकारात्मक होतास, तेव्हा पवित्र आत्मा इतरांमध्ये जे करणे आवश्यक होते ते करत राहिला. तू एका महिन्यासाठी पाठपुरावा करणे थांबवू शकतोस, परंतु मी कार्य करणे सुरू ठेवतो—तू वर्तमानात किंवा भविष्यात जे काही करशील त्यामुळे पवित्र आत्म्याचे कार्य थांबत नाही. काही नकारात्मक अवस्था मानवी दुर्बलतेतून येतात; जेव्हा लोक विश्वास ठेवतात, की ते देवाच्या अपेक्षा पूर्ण करण्यास अथवा त्यांचे आकलन करण्यास खरोखर असमर्थ आहेत, तेव्हा ते नकारात्मक होतात. उदाहरणार्थ, ताडणाच्या वेळी, देवाची वचने ताडणादरम्यान देवावर प्रेम करण्याविषयी बोलतात, परंतु लोक स्वतःला असमर्थ मानतात. त्यांना विशेषतः वाईट वाटले आणि शोक वाटला, की त्यांचा देह सैतानाने इतका खोलवर दूषित केला आहे व त्यांची क्षमता खूप कमी आहे. या वातावरणात आपण जन्माला आलो आहोत हीच खेदाची गोष्ट असल्याचे त्यांना वाटले. आणि काही लोकांना असे वाटले, की देवावर विश्वास ठेवण्यास व देवाला ओळखण्यास त्यांना खूप उशीर झाला आहे आणि ते परिपूर्ण बनण्यास पात्र नाहीत. या सर्व सामान्य मानवी अवस्था आहेत.

मनुष्याचा देह सैतानाचा आहे, तो बंडखोर प्रवृत्तींनी भरलेला आहे, तो अत्यंत मलीन झालेला आहे आणि तो अशुद्ध आहे. लोक देहाच्या उपभोगाची खूप लालसा करतात व देहाची अनेक प्रकटीकरणे आहेत; म्हणूनच देव मनुष्याच्या देहाचा काही प्रमाणात तिरस्कार करतो. जेव्हा लोक सैतानाच्या मलीन, भ्रष्ट गोष्टी टाकून देतात, तेव्हा त्यांना देवाचे तारण प्राप्त होते. पण तरीही जर त्यांनी स्वतःला मलिनता आणि भ्रष्टाचारापासून दूर केले नाही, तर ते अजूनही सैतानाच्या अधिपत्याखाली जगत आहेत. लोकांची फसवणूक, कपट व कुटिलपणा या सर्व सैतानाच्या गोष्टी आहेत. देवाने केलेले तुझे तारण म्हणजेच सैतानाच्या या गोष्टींपासून तुला बाहेर काढणे आहे. देवाचे कार्य चुकीचे असू शकत नाही; हे सर्व लोकांना अंधारापासून वाचवण्यासाठी केले जाते. जेव्हा तू विशिष्ट टप्प्यापर्यंत विश्वास ठेवतोस आणि देहाच्या भ्रष्टतेपासून स्वतःला वेगळे करू शकतोस व यापुढे या भ्रष्टाचारात अडकलेला नसतोस, तेव्हा तुला वाचवले गेलेले नसेल का? जेव्हा तू सैतानाच्या अधिपत्याखाली राहतोस, तेव्हा तू देव प्रकट करण्यास असमर्थ असतोस, तू काहीतरी मलीन असतोस आणि तुला देवाचा वारसा मिळू शकत नाही. तू शुद्ध व परिपूर्ण झाल्यावर, तू पवित्र होशील, तू सामान्य व्यक्ती होशील आणि तुला देवाचा आशीर्वाद मिळेल व देवाला आनंद होईल. आज देवाने केलेले कार्य तारणाचे आहे आणि त्याशिवाय, ते न्याय, ताडण व शापाचे आहे. त्याला अनेक पैलू आहेत. तुम्ही सर्व पाहत आहात, की देवाच्या उच्चारांमध्ये न्याय आणि ताडण तसेच शाप असतात. मी प्रभाव साध्य करण्यासाठी, लोकांनी स्वतःला ओळखण्यासाठी बोलतो, लोकांना मृत्यू देण्यासाठी नाही. माझे हृदय तुमच्यासाठी आहे. बोलणे ही एक पद्धत आहे ज्याद्वारे मी कार्य करतो; वचनांद्वारे मी देवाची प्रवृत्ती व्यक्त करतो आणि तुला देवाची इच्छा समजून घेण्याची अनुमती देतो. तुझा देह मृत्यू पावू शकतो, पण तुझ्यात आत्मा व सार आहे. जर लोकांकडे फक्त देह असता, तर त्यांच्या श्रद्धेला काही अर्थ नसता आणि मी केलेल्या या सर्व कार्यालादेखील काही अर्थ नसता. आज मी एकप्रकारे बोलतो व नंतर दुसऱ्या; काही काळासाठी मी लोकांबद्दल अत्यंत द्वेषपूर्ण असतो आणि नंतर काही काळासाठी मी अत्यंत प्रेमळ असतो; मी हे सर्व तुमच्या प्रवृत्तींमध्ये बदल घडवून आणण्यासाठी तसेच देवाच्या कार्याबद्दलच्या तुमच्या धारणा बदलण्यासाठी करतो.

शेवटचे दिवस आले आहेत आणि जगभरातील देश गोंधळात आहेत. राजकीय गोंधळ आहे, उपासमार, रोगराई, पूर, दुष्काळ सर्वत्र दिसत आहेत. मनुष्याच्या जगात प्रलय आहे; स्वर्गानेही संकटे पाठवली आहेत. हे शेवटच्या दिवसांचे संकेत आहेत. पण लोकांना ते आनंदाचे व वैभवाचे जग वाटते; ते अधिकाधिक तसे होत चालले आहे, लोकांचे हृदय त्याकडे आकर्षित होत आहे आणि बरेच लोक त्यात अडकले आहेत व त्यातून स्वतःला बाहेर काढू शकत नाहीत; जे लोक फसवणूक आणि जादूटोण्यात गुंतले आहेत, ते मोठ्या संख्येने फसवतील. जर तू प्रगतीसाठी झटत नसशील, तुझ्याकडे कोणीही आदर्श नसतील व तू खर्‍या मार्गाने स्वतःची मुळे रुजवली नसतील, तर तू पापाच्या लाटेमध्ये वाहून जाशील. सर्व देशांच्या तुलनेत चीन सर्वात मागासलेला आहे; ही अशी भूमी आहे जेथे अग्निवर्ण अजगर विळखा घालून बसला आहे, येथे सर्वात जास्त असे लोक आहेत जे मूर्तींची उपासना करतात आणि चेटूक करतात, येथे सर्वात जास्त मंदिरे आहेत व ही अशी जागा आहे जेथे दुष्ट राक्षस राहतात. तू त्यातूनच जन्माला आला आहेस, तू त्यातून शिक्षित झाला आहेस आणि त्याच्या प्रभावात अडकला आहेस; त्याने तुला भ्रष्ट केले आहे व यातना दिल्या आहेत, परंतु जागृत झाल्यानंतर तू त्याचा त्याग करतोस आणि देव तुला पूर्णपणे प्राप्त करतो. हा देवाचा महिमा आहे आणि म्हणूनच कार्याच्या या टप्प्याला खूप महत्त्व आहे. देवाने इतक्या मोठ्या प्रमाणावर कार्य केले आहे, बरीच वचने उच्चारली आहेत व तो शेवटी तुम्हाला पूर्णपणे प्राप्त करेल—हा देवाच्या व्यवस्थापनाच्या कार्याचा एक भाग आहे आणि तुम्ही सैतानाशी झालेल्या देवाच्या लढाईतील “विजयाची लूट” आहात. जितके तुम्हाला सत्य समजेल व चर्चचे तुमचे जीवन जितके चांगले असेल, तितकेच अग्निवर्ण अजगराला त्याच्या गुडघ्यांवर आणले जाईल. या सर्व आध्यात्मिक जगाच्या बाबी आहेत—त्या आध्यात्मिक जगाच्या लढाया आहेत आणि जेव्हा देव विजयी होईल, तेव्हा सैतान लज्जित होईल व खाली पडेल. देवाच्या कार्याच्या या टप्प्याला प्रचंड महत्त्व आहे. देव अशा मोठ्या प्रमाणावर कार्य करतो आणि लोकांच्या या समूहाला पूर्णपणे वाचवतो, जेणेकरून तुम्ही सैतानाच्या प्रभावापासून वाचू शकाल, पवित्र भूमीत राहू शकाल, देवाच्या प्रकाशात राहू शकाल व प्रकाशाचे नेतृत्व आणि मार्गदर्शन मिळवू शकाल. मग तुझ्या जीवनाला अर्थ आहे. तुम्ही जे खाता व परिधान करता ते नास्तिकांपेक्षा वेगळे असते; तुम्ही देवाच्या वचनांचा आनंद घेता आणि अर्थपूर्ण जीवन जगता—आणि ते कशाचा आनंद घेतात? ते फक्त त्यांचा “वडिलोपार्जित वारसा” व “राष्ट्रीय भावना” यांचा आनंद घेतात. त्यांच्यामध्ये माणुसकीचा किंचितही अवशेष नाही! तुमचे कपडे, शब्द आणि कृती सर्व त्यांच्यापेक्षा वेगळ्या आहेत. शेवटी, तुम्ही मलिनतेमधून पूर्णपणे सुटाल, यापुढे सैतानाच्या मोहात अडकणार नाही व देवाची दैनंदिन तरतूद प्राप्त कराल. तुम्ही नेहमी सावध असले पाहिजे. तुम्ही मलीन जागी राहत असलात, तरी तुम्हाला मलिनतेचा स्पर्श झालेला नाही आणि तुम्ही देवासोबत जगू शकता, त्याचे महान संरक्षण मिळवू शकता. देवाने या पिवळ्या भूमीवर सर्वांमधून तुमची निवड केली आहे. तुम्ही सर्वात आशीर्वादित लोक नाही का? तू निर्मिलेला प्राणी आहेस—तू अर्थातच देवाची उपासना केली पाहिजेस आणि अर्थपूर्ण जीवनाचा पाठपुरावा केला पाहिजेस. जर तू देवाची उपासना करत नसशील आणि तुझ्या मलीन देहात राहत असशील, तर मग तू फक्त मानवी पोशाखात असलेला पशू नाहीस का? तू मनुष्य आहेस म्हणून तू स्वतःला देवासाठी खर्च करावेस व सर्व दुःख सहन करावेस! आज तुला सहन कराव्या लागलेल्या छोट्याशा दुःखांचा आनंदाने आणि खात्रीने स्वीकार केला पाहिजेस व तू ईयोब आणि पेत्रासारखे अर्थपूर्ण जीवन जगले पाहिजेस. या जगात, मनुष्य सैतानाची वस्त्रे परिधान करतो, सैतानाचे अन्न खातो व सैतानाच्या अंगठ्याखाली कार्य करतो आणि सेवा करतो, त्याच्या मलिनतेमध्ये पूर्णपणे पायदळी तुडवला जातो. जर तुला जीवनाचा अर्थ समजला नाही किंवा खरा मार्ग मिळाला नाही, तर अशा जगण्यात काय महत्त्व आहे? तुम्ही योग्य मार्गाचा पाठपुरावा करणारे, सुधारणा शोधणारे लोक आहात. तुम्ही अग्निवर्ण अजगराच्या राष्ट्रात उठलेले लोक आहात, ज्यांना देव नीतिमान म्हणतो. हेच सर्वात अर्थपूर्ण जीवन नाही का?

मागील:  देवाच्या कार्यामागची दृष्टी (३)

पुढील:  देहधारणेचे रहस्य (१)

सेटिंग्ज

  • मजकूर
  • संकल्पना

एकच रंग

संकल्पना

फाँट्स

फाँट आकार

ओळींमधील अंतर

ओळींमधील अंतर

पानाची रुंदी

अनुक्रमणिका

शोधा

  • हा मजकूर शोधा
  • हे पुस्तक शोधा

Connect with us on Messenger