अध्याय ४९
समन्वयाने सेवा करण्यासाठी, एखाद्याने योग्यरीत्या, उर्जेसह आणि स्पष्टपणे समन्वय साधला पाहिजे. शिवाय, त्या व्यक्तीमध्ये चैतन्य, जोम व आत्मविश्वास असला पाहिजे, जेणेकरून इतर लोक जेव्हा ते पाहतात, तेव्हा त्यांना समाधानी वाटेल आणि ते पूर्ण होतील. माझी सेवा करण्यासाठी, तुम्ही माझ्या इच्छेनुसार सेवा केली पाहिजे, माझ्या हृदयाशी अनुरूप असले पाहिजे तसेच माझे हेतू पूर्ण केले पाहिजेत, जेणेकरून मी तुमच्यामध्ये जे काही साध्य करतो त्याद्वारे मी समाधानी असेन. तुमचे जीवन माझ्या वचनाने भरून टाका, तुमचे भाषण माझ्या सामर्थ्याने भरून टाका-मी तुम्हाला ही विनंती करतो. तुमच्या स्वतःच्या इच्छांचे पालन केल्याने माझ्यासोबतचे साम्य दिसून येते का? त्यामुळे माझे हृदय संतुष्ट होईल का? माझ्या हेतूंचे प्रामाणिकपणे निरीक्षण करणारे तुम्ही आहात का? माझे हृदय समजून घेण्याचा खरोखर प्रयत्न करणारे तुम्ही आहात का? तुम्ही खरोखरच स्वतःला माझ्यासमोर अर्पण केले आहे का? तुम्ही खरोखरच माझ्यासाठी स्वतःला कष्टात टाकले आहे का? तुम्ही माझ्या वचनांचा विचार केला आहे का?
मनुष्याने प्रत्येक बाबतीत शहाणपणाचा वापर केला पाहिजे आणि माझ्या परिपूर्ण मार्गावर चालण्यासाठी शहाणपणाचा वापर केला पाहिजे. जे माझ्या वचनानुसार वागतात ते सर्वांत ज्ञानी आहेत व जे माझ्या वचनानुसार वागतात ते सर्वात आज्ञाधारक आहेत. मी जे म्हणतो तसे होते आणि तुम्हाला माझ्याशी वाद घालण्याची किंवा माझ्याशी तर्क करण्याचा प्रयत्न करण्याची गरज नाही. मी जे काही बोलतो, ते सर्व मी तुम्हाला ध्यानात ठेवून सांगतो (मग मी कठोर किंवा सौम्य असलो तरीही). जर तुम्ही आज्ञाधारक राहण्यावर लक्ष केंद्रित केले, तर ते चांगले होईल व हा शहाणपणाचा खरा मार्ग आहे (आणि तुमच्यावर होणारा देवाचा न्याय रोखण्याचाही). आज, माझ्या घरात, माझ्यासमोर नम्र होऊन माझ्या पाठीमागे इतर गोष्टी बोलू नका. तुम्ही व्यावहारिक व्हावे अशी माझी इच्छा आहे; तुम्हाला अलंकारिक वक्तृत्व वापरण्याची गरज नाही. जे व्यावहारिक आहेत त्यांच्यासाठी सर्वकाही आहे. जे नाहीत त्यांच्यासाठी काहीही नाही. त्यांची शरीरेही त्यांच्याबरोबर अस्तित्त्वशून्यतेत परत जातील, कारण व्यावहारिकतेशिवाय, केवळ शून्यता आहे; इतर कोणतेही स्पष्टीकरण नाही.
देवाविषयी तुमच्या श्रद्धेमध्ये, तुम्ही उत्सुक असावे असे मला वाटते आणि तुम्ही काय मिळवाल किंवा गमवाल याचा विचार करू नका अथवा तुमच्या सर्व गोष्टींचा विचार करू नका; तुम्ही फक्त तुमचे पाय खर्या मार्गावर ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे व कोणाच्याही प्रभावाखाली किंवा कोणाच्या नियंत्रणात नसावे. यालाच चर्चचा आधारस्तंभ, राज्याचा मात करणारा म्हणून ओळखले जाते; अन्यथा इतर काही करणे म्हणजे तुम्ही माझ्यासमोर जगण्यास योग्य नाही.
वेगवेगळ्या परिस्थितीत, माझ्या जवळ येण्याचा मार्गदेखील वेगळा असतो. काही लोकांना सुंदर वचने बोलायला आणि माझ्यासमोर भक्तिभावाने वागायला आवडते. तथापि, माझ्या पाठीमागे ते पूर्ण विस्कळीत असतात व त्यांच्या ठायी माझ्या वचनांचा अभाव असतो. ते घृणास्पद आणि त्रासदायक असतात; मग ते एखाद्याला सुधारू शकतील किंवा एखाद्यासाठी काही प्रदान करू शकतील याचा प्रश्नच नाही. केवळ तुम्ही माझ्याशी अधिक जवळीक अथवा सहभागिता करू शकत नाही म्हणून तुम्ही माझ्या हृदयाचा विचार करू शकत नाही असे नाही; तुम्ही मला सतत तुमच्यासाठी काळजी व श्रम करायला लावता.